पोलिसांनी योग्य तक्रारीची दखल न घेतल्याने तरुणाने स्वतः ला संपविले.

पोलीस वेळीच गुन्हे नोंदवत नसल्याचे हे परिणाम आहेत, प्रकरण बाहेरच्या बाहेर मिठवण्याचा पोलीस प्रयत्न करतात!



अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंग वरून बिल्डरांनी रहिवाष्यामध्ये वाद लावून दिले आहेत.

पार्किंगच्या कारणावरून त्याचा सोसायटीमधील दोघेजण आणि बांधकाम व्यावसायिकाशी वाद होता. शिवीगाळ, मारहाण केल्याबाबत रोहिदासने त्यांच्याविरुद्ध दोनदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी त्याची मागणी होती.

हेही वाचा 👉👉  | पोलिसां विरुद्ध तक्रार कशी करावी.

मारहाण करणाऱ्यांना पोलिस अटक रोहिदास जाधव करीत नसल्यामुळे एका तरुणाने वाघोली पोलिस चौकीच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

रोहिदास अशोक जाधव (वय ३३, रा. वाघोली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास डोमखेल रस्त्यावरील सिद्धी पार्क सोसायटीमध्ये राहत होता.

हेही वाचा : 👉👉  पोलिसांनी अटक केल्यास घाबरू नये या कायदा वाचा 

Post a Comment

Previous Post Next Post