![]() |
| घरकुल संदर्भात निवेदन. |
घरकूल अनुदान तीन लाख पन्नास हजार रू. पर्यंत वाढवून मिळावे.
गेंद्या पावरा, अध्यक्ष युवक काँग्रेस शिरपूर तालुका यांची मागणी.
शिरपूर : केंद्र सरकार व राज्य सरकार मिळाऱ्या प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, रमाई आवास योजनेअंतर्गत मिळाणाऱ्या घरकूलची रक्कम तीन लाख पन्नास हजार रू. वाढवून मिळावी अशी मागणी युवक काँग्रेसचे शिरपूर अध्यक्ष गेंद्या पावरा यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्या मार्फत वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भीडले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे भाव सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. मात्र दुसरीकडे गरीबांना हक्काच्या घरात राहता यावे याकरिता भारत सरकार व राज्य सरकार कडून प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजना राबविण्यात आलेली आहे.
उदात्त हेतूने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजनेसाठी शासनाकडून मिळणारा निधी अत्यंत कमी आहे. मात्र एकीकडे सिमेंट, वाळू, विटा, डबर, मजूरी, लोखंड इत्यादींचे यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वाढत्या महागाईमूळे सदर लाभार्थी आपल घर बांधू शकत नाही. ग्रामीण भागातील लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू घेण्यासाठी शहरात म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी जातो. तेथून घरकुल बांधण्यासाठी आवश्यक वस्तू घरी आणणे वाढत्या महागाईमुळे खूप खर्चिक झाले आहे.
हेही वाचू शकता.केंद्र शासनाचा निर्णय आता पुन्हा रेशन कार्डधारकांना पुन्हा मोफत धान्य.
त्यामुळे शासनाकडून प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजनांतर्गत मिळणाऱ्या घरकूल अनुदानाची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये पर्यंत वाढवून मिळावी. जेणेकरून गरीब लाभार्थी आपलं हक्काचं घर बांधू शकेल. अशी मागणी युवक काँग्रेसचे शिरपूर तालुका अध्यक्ष गेंद्या पावरा यांनी केली आहे. निवेदन देताना भोंग्या पावरा, अरविंद पावरा, ढेमा पावरा, साहेबराव पावरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
