- ग्रामपंचायतींची रचना: ह्या ग्रामपंचायत रचनेत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), महिला प्रवर्गासाठी जागांच्या आरक्षणासह ग्रामपंचायती स्थापन करण्याची प्रक्रिया आहे.
- ग्रामपंचायतींचे अधिकार आणि कार्ये: ग्रामपंचायतींचे अधिकार आणि कार्ये करणे स्थानिक प्रशासन, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि पायाभूत सुविधांचा विकास ग्रामपंचायतींत समाविष्ट आहे.
- निवडणुका: नियमित निवडणुकांचे आयोजनकरून ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कार्यकाळ संधर्भात माहिती आहे.
- वित्त: ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे स्रोत, अनुदान विकास प्रकल्पांवर खर्च करण्याचे अधिकार ग्रामपंचायतला आहे.
- समित्या आणि अधिकारी: ग्रामपंचायतींमध्ये काही समित्यांची निर्मिती आहे. प्रभावी कारभार सुनिश्चित करण्यासाठी समित्यांची नियुक्ती मध्ये अध्यक्ष आणि सचिव असणे आवशक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत स्थापन
कमीत कमी 600 लोकसंख्या डोंगराळ भागात 300 लोक सख्या असेल तर ग्रामपंचायत स्थापन करता येते. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 - नियम 5 नुसार ग्रामपंचायत गाव पातळीवर स्थापन करता येते. ( Maharashtra Gram Panchayat Act 1959 in Marathi ) ग्रामपंचायत गाव पातळीवर विकास करणारी संस्था आहे. निवडणूक दर 5 वर्षांनी होते. ग्रामपंचायत सदस्य संख्या लोकसंख्येवर आधारित आहे. उदा.7,9,12,15,17... सदस्य वॉर्डातून प्रत्यक्ष गुप्त मतदान करून निवडून येतात. निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची सरपंच व एकाची उपसरपंच म्हणून निवड करण्यात येते. सरपंच,उपसरपंच,सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो.अपवाद स्थितीत कमी कालावधी मिळतो.किंवा पदावरून हटवता येतो.
संबंधित लेख हेही वाचा - आदर्श गाव सरपंचाची महत्त्वाची भूमिका....सरपंच चे कार्य आणि जबाबदारी. जाणून घ्या.. वाचा आणि शेअर करा..
महाराष्ट्र ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था-
- 1.ग्रामीण शासन संस्था.
ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या ग्रामीण शासन संस्था आहेत.
खेड्याचा,ग्रामीण भागाचा विकविध योजना राबवून विकास करणे हे प्रमुख कार्य असते.
- 2.शहरी शासन संस्था.
शहरी भागाचा विविध योजना योजना राबवून विकास साधणे.
- 3 ग्राम सभा.
गाव पातळीवर 2 महिन्यातून 1 व वर्षातून किमान 6 ग्रामसभा घेणे आवश्यक असते.
प्राप्त परिस्थितीत सरपंच, ग्रामसेवक अधिक सभा आवश्यकतेनुसार लावू शकतात.
- ४ महिलांची सभा -
- ५ ग्रामस्थ/नागरिक.
गाव विकासासाठी गावातील नागरिक,ग्रामस्थ शिक्षित व जागरूक असणे आवश्यक असते.त्यांनी ग्राम सभेला उपस्थित राहणे आवश्यक असते.आपल्या गावातील विविध समस्या स्वतः किंवा सामूहिकपणे ग्रामसभेत सांगणे आवश्यक असते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा नुसार ग्रामपंचायत योजना
विविध योजना,गावातील समस्या यावर योग्य कामकाज चालू आहे की नाही. सरपंच,सदस्य, ग्रामसेवक,हे व्यवस्थित काम करत की नाही.यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते.जर व्यवस्थित कार्य करत नसतील तर सामूहिकपणे ग्रामसभेत सांगणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा नुसार कामे.
चांगले कार्य/काम करत असतील तर सरपंच,सदस्य, ग्राम सेवक यांचे अभिनंदन करणे आवश्यक असते.कामात प्रोत्साहन देणे आवश्यक असते.
*आपल्याच गावाचा आपणच विकास करू शकतो.
*गाव करील तो राव काय करील.*
*आपला गाव ,आपला विकास*
Gram Panchayat Act in Marathi pdf
