मुख्यालयी राहणे शासन निर्णय GR to stay headquartered by staff.

GR to stay headquartered by staff.ग्रामीण बातम्या
ग्रामपंचायत मुख्यालय.

ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनि मुख्यालयी राहण्याचा दृष्टीने आवश्यक त्या सूचना.

जिल्हा परिषमार्फत शासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून याशिवाय राज्यातील जनतेला विशेषता ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते. याकरिता जिल्हा परिषद मार्फत

 नियुक्ती केल्या जाणाऱ्या वर्ग-3 चा कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना त्याला इराणी बंधनकारक केले आहे त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक आरोग्य सेवक तसेच शिक्षकांना त्यांच्या मुख्यालयी राहणे आवश्यक आहे असे असताना बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी हे स्थानिक सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालय राहत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यामुळे पंचायत राज समितीने सन 2017/2018 तेरावी महाराष्ट्र विधानसभा चौथ्या अनुपालन अहवाल याद्वारे शासनाच्या निदर्शनास आणले आहे की ग्रामीण पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.

या बाबी विचारात घेऊन आवश्यक त्या कार्यवाही करावी व रहिवासी दाखला कोणामार्फत व कसा घ्यावा याबाबत आवश्यक त्या सूचना त्वरित देण्यात यावा याकरिता.

 शासन परिपत्रक

 वित्त विभागाच्या दिनांक 25 /4 /1988 व दिनांक 5/2/ 1990 च्या शासन निर्णयात घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे हे स्पष्ट नसल्याने ग्रामविकास विभागाने दिनांक 5/7/2008 तसेच 3 /11/ 2008 च्या परिपत्रक वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन 1990 च्या तर तूदीशी अधिक्रमित ठरत नाही. त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता अनुज्ञेय ठरतो त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता देण्याचे मान्य न्यायालयाने आदेश दिले आहेत.

 अधिक माहितीसाठी संबंधित पीडीएफ वाचा.

Post a Comment

Previous Post Next Post