![]() |
| ग्राम दक्षता समिती |
शिरपूर तालुक्यातील रास्तभाव दुकाने यांचे वर नियंत्रण ठेवणे कामी ग्राम दक्षता समिती करण्यात आली आहे.
मा जिल्हाअधिकारी यांचे आदेश शिरपूर तालुक्यातील रास्तभाव दुकाने यांचे वर नियंत्रण ठेवणे कामी ग्राम दक्षता करण्यात आली आहे.तसेच संदर्भ क्र 2 अन्वये सधर ग्राम दक्षता समिती चे सरपंच हें प्रसिद्ध अध्यक्ष तसेच तलाठी हें प्रसिद्धी सदस्य सचिव असणार आहेत.
कार्यकक्षेतील सजा / गावांचे ग्रामदक्षता समिती च्या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून दर महिना आयोजित करून सर्व संबंधिना त्यांच्या स्तरावरून तात्काळ कळविण्यात येत आहे.
दर महा 15 तारखे पर्यंत ग्राम दक्षता समिती च्या बैठकीचे इतिवृत कार्यालयात विना विलंब सादर करणे यावे तसेच दक्षता समिती चे दरमहा बैठक आयोजित करण्यात आली तर संबंधित तलाठी जबाबदारी रहाणार असून तांच्या विरुद्ध शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ग्राम दक्षता समिती बैठक सदस्या समोर चालू महिन्यातील प्राप्त मालाचे नियनत दाखवून प्राध्यान्य कुटुंबं लाभार्थी आणि अंत्योदय शिधापत्रिका धारक साठी वाटत कामी मंजूर असलेला धान्य साठा रीतसर पंचनामा करून रास्त भाव दुकान दारा कडे उतरून घेतलेला असे प्राध्यान्य कुटुंबं लाभार्थी आणि अंत्योदय शिधापत्रिका धारक शासनाचे निर्देशीत नियमानुसार केलेल्या वाटप करावे त्यात कोणाचेही तक्रारी नाही किंवा आहे असे तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त निर्देश सूचनाचे पालन सर्व सदस्य समोर करण्यात आली असावी.
आजपर्यंत ग्रामदक्षता समिती हि शासननिर्णय व समित्या फक्त कागतपत्र असून प्रत्याक्षता याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही कारण गावात माल किती आल्या आवही सूचना अथवा गावकर्यांच्या कल्पना देखील दिली जात नाही म्हणून या निर्णयाला संबंधित अधिकारी,तलाठी ,सरपंच,पोलीस पाटील, दक्षता समीति व सदस्य यांनी संगंत मताने गोरगरीब सर्वसामान्य रेशन चा धान्यावर आशा ठेऊन जगणारे लोकांची दिशा बुल करून आदेश वार्यावर भरारी खात असतो
स्वताच्या स्वार्थ साठी भयंकर मह्घाई च्या काळात शासनाचे उद्देश सफल न होऊ देण्यासाठी संबंधित रेशन दुकान दार भ्रष्ट विचार सारणी चे मानवतेला कळंब फासणारे आमिषाला बळी पळून रेशन च्या अन्न धान्या मध्ये अभिलाषा पोटी काटकर स्थान करून माल पुरेसा कधी मिळतो तर कधी मिळत नाही जनतेचा दिशाभूल करून ह्या आदेशाला केराची टोपली केली आहे.
बाहेर गावी रोजगार निमित्त गेलेले मजूर ते बाहेर गावी असतांना त्यांचा रेशन वरील थंब अपडेट करून माल कोण खातो याची चौकशी होणे गरजेचे आहे. ते गावात नाही तर शिल्लक माल का दाखवू शकत नाही पूर्ण वाटप कशी तेही दोन व तीन रुपये किलो चे धान्य गोर गरीब जनतेचा नावावर कशे गायब होते याची शासन दरबारी चौकशी होऊन संबंधित यांच्या वर गुन्हे व्हावे जनतेची मागणी.
रेशन चा माल गावात आल्यावर दवंडी द्यायला हवी ती देखील दिली जात नाही. मालच चोरून लपून ठरावीक कार्ड धारकाना माल वाटप करून दुकान दार दोन दिवसात माल वाटप करून कोबारा करतात. तसेच शासन निर्णया नुसार महिन्यातून तीस दिवस रेशन सुरु ठेवणे आवश्यक आहे कारण गोर गरीब लोकांकडे माल घेण्यासाठी पैसे असतात तर कधी नसतात, मजुरीचे पैसे भेटल्यावर तो माल घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रेशन दुकान हे महिना अखेर पर्यंत सुरु राहायला हवे. अशी दक्षता संबंधित अधिकारी यांनी घ्ययला हवी. एख्याद्या रेशन कार्ड धारकांनी तक्रार केल्यास थातूर मातुर समज देऊन तक्रार निकाली काढण्यास अधिकारी हुशार आहेत, कारण रेशन कार्ड धारक हा खोटी तक्रार करितो रेशन दुकान दार खरा. गंगेचा प्रवाह हा शासन दरबारी सरळवाहताना दिसून येत नाही नेहमी विरूद्ध दिशेला वाहतो. तरी वरीष्ठ पातळीवरून चौकशी निपक्षपाती होणे गरजेचे आहे . कारण जनता तक्रार करून करून थकली न्यायाच्या अपेक्षातून निराश झाली. याला कारणेभूत संबंधित शासन प्रतिनिधी
येथे क्लीक करून PDF फाईल पहा.
