![]() |
| Regarding giving separate ration card to Divyang. Ruling. |
दिव्यांग यांना स्वतंत्र शिधापत्रिका देणेबाबत. शासन निर्णय. दिनांक 21 डिसेंबर 2020.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार 76.32 टक्के ग्रामीण 469.71 लक्ष व45.34 टक्के शहरी 230.45 लक्ष अशी एकूण 700.16 लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. या अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात आली आहे. सदर अधिनियमांतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय योजनेतील सर्व लाभार्थी व बीपीएल गटातील सर्व लाभार्थी प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आले आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात सर्वत्र करण्यात आले आहे.
2013 नुसार शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याचा लाभ जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात व त्यांची नावे त्यात शिधापत्रिकेत नमूद असलेले देखील पात्र दिव्यांग व्यक्ती अन्नधान्य अन्य धान्य मिळवण्यापासून वंचित रहात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे त्या अनुषंगाने सूचना देत आहे.
राज्यांमधील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाने संबंधित क्रमांक 1 2 व 3 येथील शासनाने निर्णय द्वारे निश्चित केलेल्या निकेशा अंतर्गत पात्र कुटुंबांना अनुज्ञा शिधापत्रिका देण्यात येते. तसेच नवीन शिधापत्रिका देताना घ्यावयाची काळजी व दक्षता या बाबत मार्गदर्शन सूचना वर नमूद केले आहे.
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम चा खालील gr pdf वाचा..
