रस्त्यावरील टपऱ्यांवर पोट भरता की बिघडवताय?

रस्त्यावरील टपऱ्यांवर पोट भरता की बिघडवताय?

रस्त्यावरील टपऱ्यांवर पोट भरता की बिघडवताय? वाटेल तो सुरु करतोय टपरी तपासणीकडे होतोय कानाडोळा.

 शिरपूर प्रतिनिधी : आजचा धकाधकीच्या जीवनात अनेकांना दोनवेळचे जेवण घरी शक्य नसते त्यामुळे दिवसातून एकदा तरी टपरीवर नास्ता खावा लागतो. पण हे अण्णा किती सुरक्षित आहे याचा विचारही केला जात नाही शहरात रस्त्याच्या कडेला पोहे,चहा,इडली, डोसा, वडा,पाव, पावभाजी, पाणीपुरी, खिचडी, अंडा,आमलेट, बिर्याणी, चायनीस आधी खाद्यपदार्थांच्या टपरीवर स्वच्छतेची कोणतीच काळजी घेतली जात नाही. एकाच पाण्यात सर्व प्लेट ठेवण्यात येतात अन्नपदार्थ हे उघड्यावर असतात.

अशा ठिकाणी खाणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते विशेष म्हणजे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकारीच नियुक्ती नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असून बिनधास्तपणे या टपर्‍या रोडच्या बाजूला थाटत आहे.

450 विक्रेत्या पालिके हद्दीत.

नगरपालिका हद्दीत जवळपास 450 टपरी आहे त्यातील अनेकांची नगरपालिका ही माहिती नाही कोणीही उठतो आणि टपरी टाकतो अशीच परिस्थिती आहे.

सकाळचा नाश्ता रस्त्यावरच. 

शहरात अनेक जण कामावर जाण्याच्या घाईत घरातून निघतात त्यामुळे सकाळचा नाश्ता ते रस्त्यावरच करतात जिभेचे लाड पुरवण्यासाठी खाव्या असल्याने नाश्त्याच्या गाड्यावर नाश्ता करतात.

 फूड सेफ्टी ऑन व्हील्स नावालाच.

शहरात फूड सेफ्टी ओन विल ही नावालाच आहे कोणत्याही रस्त्यावर टपरी किंवा इतर ठिकाणावरून अशा प्रकारे तपासणी केली जात नाही

 या रस्त्यावर जिभेचे लाड आरोग्याची ऐसी तैसी

 रस्त्यावरील टपऱ्या रस्त्याच्या बाजूला गटारी च्या कडेला असतात याठिकाणी घोड्यावरचा ना ठेवण्यात येते स्वच्छतेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही उघड्यावर टाकले जाते.

ना परवाना तपासणी ना कुठलीही कारवाई.

 टपरी साठी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असते परंतु बिंदास्त परवानगी न घेता वाटेल त्या ठिकाणी नाश्ता च्या गाड्या लावतात दिसून येतात.

लोक दररोज पाहतात? तरी तेथेच जातात? 

 करवंद नाका:

या परिसरात रस्त्याच्या बाजूला आणि त्यांची टपरी सुरू केले आहेत. बहुतांश पदार्थ हे झाकलेले नव्हते त्यामुळे गडावरची धुळे पदार्थावर बसत होती तरी गाड्यावर गर्दी होती.

 बस स्टॅन्ड: टपाथवर एक ओळीत हात गाडी लावलेले होते तसेच अंडा गल्लीत अंड्याच्या गाड्यावर मद्यपी ची शाळा भरली होती पिण्याच्या पाण्यात एकच ग्लास बुडून पाणी पीत होती.

 निमझरी नाका : या रस्त्यावर नास्तापासून ते जेवणापर्यंत गाड्या यागलेले असून प्लेट ह्या एकाच बादलीत मिसळ्ल्या जाताय व घाणेरड्या कापडला पुसून दिल्या जात होत्या.

 हॉटेल चालकाचे किंवा काम करणारे यांचा वर कार्यवाही आणि गुन्हा दाखल कसा करावा.

काही हॉटेल ची अवस्था पाहून लोकांची खायचे मन लागत नाही. रस्त्याचा कडेला हॉटेल वर धूर उडत खाद्य पदार्थ वर जात असल्यास, हॉटेल चालक जास्त पैसे घेत असल्यास, हॉटेल मध्ये पाणी पिण्या आयोग असल्यास, रस्त्याच्या कडेला पोहे,इडली,सामोसा, डोसा, वडापाव, पावभाजी, पाणीपुरी, खिचडी, अंडा,आमलेट, बिर्याणी, चायनीस आधी खाद्यपदार्थ झाकलेले नसल्यास. हॉटेल मध्ये तंबाखू चे ब्यानर नसल्यास.

आपण जिल्ह्यातील पोलीस प्रशासन यांच्या कडे ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वर जीवनावश्यक वस्तूंची भेसळ संबंधि ऑपशन करून तक्रारी करू शकता. किंवा फूड सेफ्टी डिपार्टमेंट जिल्हा कडे, विभाग कडे, मंत्रालया यांचा कडे चौकशी आणि कार्यवाही तसेच दुकानावर सील लावण्याची कार्यवाही संबंधित तक्रारी करू शकता..


Post a Comment

Previous Post Next Post