महानायक बिरसा मुंडा यांच्या 122 व्या स्मृती दिन निमित्त आदिवासी सन्मान परिषद.

आदिवासी सन्मान परिषद
आदिवासी सन्मान परिषद

आदिवासी बंधू-भगिनींनो

 कधी नव्हे ते तेवढे या काळात आदिवासी समुदाय आणि आपल्याच आत्मसन्मानासाठी अधिक जागृत राहण्याची गरज निर्माण झाली आहे कारण अनेक बाजूंनी आदिवासींचा विरोधात षडयंत्र सुरू झाले आहेत काही षडयंत्र दृश्य आहेत तर काही अदृश्य जर ही सनातनी षड्यंत्र यशस्वी झाली तर आदिवासी समुदाय येणाऱ्या काळात आपला सन्मान गमावून गुलामीच्या पथावर अग्रेषित होईल अशी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे म्हणून आपल्याला खालील काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी महानायक बिरसा मुंडा यांच्या 122 व्या स्मृती  प्रित्यर्थ गुरुवार दिनांक 9 जून दोन हजार बावीस रोजी समता मैदान यवतमाळ येथे भव्य आदिवासी सन्मान परिषद आयोजित करण्यात आली आहे.

महानायक बिरसा मुंडा यांच्या 122 व्या स्मृती दिन निमित्त

हेही वाचा 

 1) आज बऱ्याच कालखंडानंतर आदिवासी माणूस आपल्या संस्कृतीत पायावर आधारलेल्या धर्माच्या शोध घ्यायला लागला तेव्हा सर्वच बाजूने धर्मांधांचे जत्य अंगावर चाल करून यायला लागले तेव्हा आम्हालाही आपल्या संरक्षणासाठी कोणीतरी हत्यार उचलणे भाग पडले काट्याने काटा काढला जातो त्याच धर्तीवर धर्माद्यांचा काढा व त्याच त्या रानी करता येईल का याची प्रश्न गावठी आदिवासी चिंता फिरू लागले त्यातूनच आदिवासी समुदायाची धर्म संकल्पना अधिक तीव्र होताना दिसत आहे या माध्यमातून आपली अस्मिता आपला सन्मान जपता येईल का? याच्या शोधात आदिवासी माणूस घेऊ लागला आहे अशा वेळी काही सनातनी संघटनांकडून आदिवासीवर आपापला धर्म लागल्याचे षड्यंत्र जोरात सुरू झाले. प्रसंगी दहशत निर्माण केल्या जात आहे यासंदर्भात आदिवासी समाजाने निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

 2) आपल्या देशातल्या काही संघटनांना आदिवासी शब्द फार झडतो आहे त्यामुळे आदिवासी शब्दाचे नष्ट करण्याचा करावाया ही मंडळी करताना दिसत आहे पाच जानेवारी 2011 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी समुदाय हा सर्वात आधी आलेल्या भारतीय समाज आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्यामुळे अधिक अस्वस्थ झालेल्या संघटनांनी आदिवासी समाजाला वनवासी करण्याचे षड्यंत्र अधिक वेगाने करायला सुरु केली आहे यापूर्वी आदिवासी समाजाकरिता राक्षस सूर्दास रानटी जंगली असते अशा शब्दांचा उपयोग करू बदनाम करण्याचा प्रयत्न पुरान काळात सुद्धा झाला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून आज वनवासी शब्दाचा उपयोग केला जात आहे आदिवासी समुदायाच्या अपमान केला जात आहे तेव्हा वनवासी शब्दावर बंदी झाली पाहिजे यासाठी ही सन्मान परिषद!

 3) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ज्योती प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून अलिकडच्या काळात एक दुरूनच बंद करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे मनुस्मृतीच्या काळात मागासवर्गीय समाजाला शिक्षणाची दारं बंद होते तोच काळ पुन्हा आणण्याची प्रस्थापितांची तयारी सुरू आहे. सगळ्या शिक्षण संस्था खाजगी भांडवलदार आकडे चालवण्यास देण्यात येत आहे सरकारी शाळा बंद केल्या जात आहे.आता तर परदेशी विद्यापीठांना भारतात शिक्षणाचा व्यापार करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षण प्रचंड मागणार झाले आहे त्याचे जवळ पैसा आहे तो शिक्षण घेऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली तर आदिवासी समाजाचे काय तो शिक्षण सम्राटांना खाजगी संस्थांची फी भरू शकणार नाही पर्यायाने तो शिक्षणापासून वंचित राहणार म्हणजेच वेगळ्या मार्गाने शिक्षण बंद होणार आहे यावर आदिवासी समुदायांची चर्चा करायला हवी की नको?

 4) सहा जुलै 2017 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आदिवासींची संविधानिक आरक्षणाचे अधिकार सुरक्षित करणाऱ्या निकाल दिला परंतु महाराष्ट्र सरकारने त्या निकालाप्रमाणे अजूनही कार्यवाही केलेली नाही अनुसूचित जमातीचे खोटे सर्टिफिकेट तयार करून काही आदिवासींनी अनुसूचित जमातीचे शिक्षण नोकरी व्यवसाय आणि राजकारणातील सवलती लुटण्याचा प्रकार झाला. या खोटारड्या लोकांवर कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले परंतु आपले सरकार त्यावर समितीच्या बसवून आधी संख्या पक्षाचे निर्मिती करून अशा खोटारड्या चोर लोकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे या आदिवासी समुदाय यांचा अपमान आहे याच्या विरोधात आपली ही सन्मान परिषद आयोजित केली आहे.

 5)  पेसा कायद्यानुसार आदिवासीबहुल गावामध्ये गाव पातळीवर च्या नोकऱ्या त्याच गावातील सुशिक्षित बेरोजगार ना देण्यात यावे अशा प्रकारच्या माननीय राज्यपालांचा आदेश असताना देखील अंमलबजावणी होताना दिसत नाही आदिवासी समाज बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे व त्या लोकांनी जागा बळकावल्या शासनाने आदिवासींच्या नोकर भरतीची मोहीम राबवण्याची गरज आहे आदिवासी आयोग उच्चशिक्षणासाठी विद्यावेतन आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध सुलभ योजनांची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.

 अशा प्रकारच्या अनेक विषयावर व समस्येवर चर्चा करून निकाली काढण्याच्या हेतूने सन्मान परिषदचे गुरुवार दिनांक 9 जून 2022 यवतमाळ येथे आयोजित केले आहे या परिषदेला आपण मोठ्या संख्येने आर्थिक सहकार्य करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महानायक बिरसा मुंडा यांच्या 122 व्या स्मृती दिन निमित्त
क्लिक करा 

अजून हेही वाचा.. क्लिक करा...

Post a Comment

Previous Post Next Post