![]() |
| ग्रामपंचायत अधिनियमानुसार बर्याच कायदेशीर तरतूदी आहेत पण त्यांची योग्य अंमलबजावणी होतांना दिसत नाही. |
वाचलं तर वाचाल पटलं तर घ्या
नावासाठी नाही तर गावासाठी
ग्रामपंचायत कारभारात नातेवाईक हस्तक्षेपास निर्बंध घातले.
ग्रामपंचायत अधिनियमानुसार बर्याच कायदेशीर तरतूदी आहेत पण त्यांची योग्य अंमलबजावणी होतांना दिसत नाही.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या, यांच्या निकटच्या नातेवाईकांनी कामामध्ये हस्तक्षेप करू नये, विषेशतः कार्यालयात मुळीच बसता कामा नये .असे शासन आदेश दिले आहेत.
तरी महिला सरपंचांचे पती , उपसरपंचांचे पती, सदस्यांचे पती/ निकट नातेवाईक ग्रामपंचायत कारभार बघतात . कारण कोणी प्रशासकीय कार्यवाही करत नाही म्हणून हे सर्रास चालते.असे होत असेल तर आशा नामधारी सदस्यांवर कार्यवाही करायला हवी .
शासन परिपत्रक निर्णय वर ठाम राहुन ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच/सदस्य यांच्या स्वतः कडुन चांगली कामगिरी करून घ्या, आम्ही नवीन आहे शिकू हळुहळू तर अशांना सांगा आता तुम्ही घरीच शिका, कारण *तुमच्या मुळे गावाचा विकास खुंटेल तुम्हाला ग्रामपंचायत कारभार जमत नसेल तर राजीनामा देण्यास सांगा.
नावा साठी नाही तर गावासाठी*
महिला सक्षमीकरण होईल तरच गावाचा विकास होईल,_ त्यांच्या पतीनां / सासरे /दिर, *निकटच्या नातेवाईकांना ठामपणे विरोध करा.
ज्या महिला बघींनीना कार्य करता येत नसेल तर, इतर सक्षम महिलांना संधी द्या.
( सदरची पोस्ट जनहितार्थ लोक जागृती साठी असून महाराष्टातील सर्व गावकरी यांच्यासाठी आहे )
*लावा ताकत आम्ही नाही वाकत*
**आपल गाव आपला विकास*
*मी समृद्ध तर गाव समृद्ध*
*गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध
ग्रामपंचायत सदस्य, वॉर्ड कसे ठरतात?
▪️ग्रामपंचायतीचं निवडणूक कशी होते ते पाहण्याअगोदर एखाद्या भागाला ग्रामपंचायत म्हणून ओळख कशी मिळते, ते आधी पाहूया.
▪️एखादं क्षेत्र किंवा भाग ज्याची लोकसंख्या 1 हजारापेक्षा जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न किमान 10 रुपये आहे अशा क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते.
▪️अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. पण, जर लोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर २ किंवा 3 गावांत मिळून जी ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत म्हणतात.
▪️गावातील मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यांतून सरपंचाची निवड केली जाते.
▪️ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येते. ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.
▪️गावातील लोकसंख्येनुसारच निवडणूक अधिकारी गावाचे वॉर्ड (प्रभाग) तयार करतात. त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या वॉर्डात केली जाते. प्रत्येक वॉर्डात समान लोकसंख्या असेल, असं पाहिलं जातं.
▪️ज्या वॉर्डात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लोकांची संख्या जास्त आहे, तो वॉर्ड राखीव ठेवला जातो.
▪️ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना - 50%, अनुसूचीत जाती-जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात, तर इतर मागासवर्ग 27%, आरक्षण दिलं जातं.
▪️आता गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य आणि वॉर्डची संख्या किती असावी, ते पाहूया.
लोकसंख्या 600 ते 1500, वॉर्ड 3, सदस्य संख्या 7
लोकसंख्या 1501 ते 3000, वॉर्ड 3, सदस्य संख्या 9
लोकसंख्या 3001 ते 4500, वॉर्ड 4, सदस्य संख्या 11
लोकसंख्या 4501 ते 6000, वॉर्ड 5, सदस्य संख्या 13
लोकसंख्या 6001 ते 7500, वॉर्ड 5, सदस्य संख्या 15
लोकसंख्या 7501 पेक्षा जास्त, वॉर्ड 6, सदस्य संख्या 17
▪️ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार निवडणुकीसाठी खर्च करण्याची मर्यादाही घालून देण्यात आली आहे.
▪️7 आणि 9 सदस्यांची ग्रामपंचायत असेल, तर सदस्याची खर्चाची मर्यादा 25 हजार, 11 आणि 13 सदस्यांची ग्रामपंचायत असेल तर 35 हजार, तर 15 आणि 17 सदस्याच्या ग्रामपंचायतीतल्या सदस्यपदाच्या उमेदवारीची खर्चाची मर्यादा 50 हजार इतकी आहे.
