Swachh Bharat Mission Grampanchayat +स्वच्छ भारत मिशन माहिती अधिकारात माहिती उघड

Swachh Bharat Mission Grampanchayat +स्वच्छ भारत मिशन माहिती अधिकारात माहिती उघड

व्यक्तीगत शौचालय बांधणीसाठी अर्ज करायचे कागदपत्रे रंगवायची आणि सरकारी अनुदान लाटायचे- वाटद ग्रामपंचायतीचा नवीन फंडा;

माहिती अधिकारात माहिती उघड. रत्नागिरी खंडाळा- स्वच्छ भारत मिशन ग्रामिण सन 2014-2019 अंतर्गत नागरिकांना शौचालय बांधणीसाठी अनुदान 12 हजार रूपये इतका करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण ‘स्वच्छ भारत मिशन’ असे करण्यात आले होते.या मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने 7 नोव्हेंबर 2014 रोजी घेतला होता .
या बारा हजार रूपयात केंद्राचा हिस्सा 75 टक्के म्हणजे नऊ हजार रुपये तर राज्याचा हिस्सा 25 टक्के म्हणजे तीन हजार रूपये इतका राहणार होता.

‘स्वच्छ भारत मिशन’
हेही वाचा .

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे - ग्रामपंचायत भ्रष्टाचार गुन्हा दाखल.


ग्रुप वाटद ग्रामपंचायत ता. जि. रत्नागिरी मध्ये या योजनेमध्ये एकूण 271 लाभार्थी पात्र ठरवले गेले आहेत. या लाभार्थ्यामध्ये एकाच कुटूंबातील तीन ते चार व्यक्तींना शौचालयचे अनुदानाचे वाटप करण्यात आले असून ही योजना गरजू लोकांपर्यत पोचलेली दिसत नाही.
असे वाटद चे सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश विश्राम रहाटे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या माहिती मधून उघड केले आहे.
सदर स्वच्छ भारत अभियान सौचालय ची बिल मागितली असता दुसऱ्या योजनेची बिले देण्यात आली आहेत. वाटद ग्रामपंचायत ही हागणदारी मुक्त केलेली घोषणा गावात खरोखर झाली आहे का कि फक्त कागदावरच रंगवण्यात आली आहे.

या सर्व बाबींकडे रत्नागिरी जिल्हा परिषद यांनी लक्ष्य देऊन चौकशी करावी अशी मागणी श्री निलेश रहाटे व तिथील ग्रामस्थ यांनी केली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post