सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे तसेच ग्रामविकासासाठी अत्यंत महत्वाच्या विषयांचे आज खालील दोन निवेदन ग्रामविकास मंत्रालय मुंबई येथे सादर केले.
विषय क्रं ०१ - ग्रामपंचायतीतील सर्व आर्थिक व्यवहार E-gram Swaraj Portal वर ऑनलाईन करण्यासाठी महिना संपल्यानंतर पुढील ३० दिवसांचे वेळेचे बंधन करण्यात यावे.
दि. १४/०२/२०२३ रोजी मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना आमच्या संगठनकडून वरील विषयाबाबतचे निवेदन देण्यात आलेले होते, मुख्यमंत्री कार्यालयाने दि. ०१/०३/२०२३ रोजी ते निवेदन ग्रामविकास मंत्रालय (पंचायतराज विभाग) बांधकाम भवनला पाठविले, परंतु त्या निवेदनवर आजपर्यंत सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा त्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. आम्ही दिलेल्या निवेदनाबाबत तुम्ही गांभिर्याने विचार करून आमची मागणी मंजूर करून ग्रामविकासाच्या चळवळीला अजून बळकट करावे.
![]() |
विषय क्रं ०२ - आदेश/पत्र क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८६७/आस्था-७ दिनांक ०५ जानेवारी २०२३ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, मुंबई या आदेशानुसार महाराष्ट्रातील एकाही ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा अवलंब करतांना आढळून येत नाही, ग्रामविकास विभागाच्या. या आदेशाला जवळपास ०५ महिने उलटून सूद्धा महाराष्ट्रातील एकाही ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीसाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन लावण्यात आलेली नाही, स्पष्ट सांगायचे म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच याला जबाबदार/दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
अपेक्षा आहे महाराष्ट्र शासन या अत्यंत महत्वांच्या विषयांची दखल घेउन सर्वसामान्य नागरिकांची मागणी मान्य करणार.
श्री इमरान पठाण (संस्थापक अध्यक्ष)
युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य.
मो.नं. ९९६७३४३३४०
