महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तक्रार अर्ज नमुना मराठी pdf | महावितरण तक्रार अर्ज नमुना | महावितरण विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.
महावितरण तक्रार अर्ज नमुना. : तुमच्या घरात किंवा शेतात वाढीव लाईट बिल आल्यास, शेतात पोल डीपी असल्यास, वीजेची तार तुटल्यास, नुकसान भरपाई कसी मंगावी त्या बद्दल कायदेशीर अडचणीत येऊ नये, त्या करिता आपणास योग्य असा महावितरण तक्रार अर्ज नमुना देत आहे. ( Mahavitaran complaint Format in Marathi )
प्रति
महावितरण महाराष्ट्र शासन
उप कार्यकारी अभियंता कार्यालय (तालुका जि, लिहा )
यांच्या सेवेशी ता. ( ) जिल्हा ( ) .
दिनांक
अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : ( )
मो. ( )
विषय : नुकसान भरपाई मिळण्याबाबत.
महोदय ,
मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता ( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी असून आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो आमच्या शेतात विद्युत वितरण चे खांब उभे केले गेले आहेत. कुप. कं. नं . ११७ नामे ( शेत असलेल्या लाभार्थी चे नाव लिहा ) असे असून विद्युत खांब उभे करून आमच्या जमिनीची कायमस्वरूपी नुकसान होत आहे.
वीज विद्युत मध्ये समाविष्ट तरतुदीनुसार कोणत्याही कंपनीला जमीन मालकाच्या पूर्वपरवानगीशिवाय विद्युत वाहिन्या उभारण्याचा कायदेशीर अधिकार नाही तरीही आमच्या शेतात एकूण ६ विद्युत खांब उभे करून जंगलात घेऊन गेले. असे असून माहिती अधिकार यांच्यात उत्तर दिले वन विभागाची पूर्व परवानगी देखील घेतले नाही.
तसेच माझ्या वडिलांच्या संमती पत्र देखील घेतली नाही . ज्या वेळी आपले कर्मचारी यांनी आमच्या शेतात विद्युत खांब उभे केले तेव्हा त्या कर्मचारी यांना आम्ही वारंवार सांगून देखील एकूण ६ खांब टाकण्यात आले. आणि विद्युत वितरण खांब न टाकण्यास सांगत्यावेळी आपले सहकार्य कर्मचारी दमदाटी करत करत ते विद्युत खांब उभे केले. आमच्या जमिनीची कायमस्वरूपी नुकसान होत असल्याने आम्हास नुकसान भरपाई देण्यात यावी. हि नम्र विनंती.
टीप : माझ्या या विनंती अर्जाचा विचार करावा . माझा या अर्जाचा विचार विमाश न झाल्यास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, यांच्या कडे तक्रार करण्यात येईल.
टीप : माझ्या या विनंती अर्जाचा विचार करावा . माझा या अर्जाचा विचार विमाश न झाल्यास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, यांच्या कडे तक्रार करण्यात येईल.
असा लिहा महावितरणला तक्रार अर्ज जेणेकरून आपल्याला योग्य तो निवाडा मिळेल. जर का ह्या तक्रारी अर्ज ची निकाली न काढल्यास २१ दिवसात मंत्रालयाला यांच्या विरुद्या तक्रार लिहा. त्या ठिकाण आपल्याला नक्कीच काम होईल.
Related Post :१) महावितरण अधिकारी विरुद्ध तक्रार कशी करावी.लिंक