अंगणवाड्यांवर" सरकारी यंत्रणेचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..."Government system and Gram Panchayat's.

माणकेश्वर येथील "अंगणवाड्यांवर" सरकारी यंत्रणेचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष...

माणकेश्वर येथील "अंगणवाड्यांवर" सरकारी यंत्रणेचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष...

ग्रामपंचायत_माणकेश्वर हद्दीत असणाऱ्या अंगणवाड्यांची परिस्थिती अतिशय बिकट,जीर्ण,मोडकळीस आलेल्या आहेत. अंगणवाड्यांना यायला स्वतःचा रस्ता देखील व्यवस्थित नाही.

लहान मुलांची,पालकांची अडचण होत आहे .

परंतु महिला_बालकल्याण_विकास विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद ,ग्रामपंचायत माणकेश्वर यांचे दुर्लक्ष असलेली हे फोटोज आहेत अंगणवाडी असो किंवा शाळा यांची बिकट परिस्थिती का होत आहे.

असा कुठेतरी गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. 

अधिकारी स्वतःची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडताना दिसत नाही किंवा लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी विसरले असे वाटत आहे. अशा या अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उभा राहत आहे.

अंगणवाड्यांचा परिसर हा अस्वच्छ ,अंगणवाड्यांना जायला रस्ता सुद्धा नाही. तर लहान मुलांनी चिखलातून #पायवाट करत कसं अंगणवाडीत जायच हे गंभीर समस्या माणकेश्वर ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळत आहेत जे जबाबदार असतील त्यांना जनतेने चोप दिला पाहिजे.

कारण की शिक्षण संस्थांची जर अशी अवस्था असेल तर त्यातील शिक्षण पद्धती कसं काय प्रगती करू शकेल. अंगणवाडीची अवस्था पाहता शेजारील झाडी,झुडपे पाहता साप,उंदरांचा वावर या अंगणवाड्यांमध्ये होताना दिसत आहे याची जबाबदारी कोण घेणार तात्काळ अंगणवाडी दुरुस्त करा.

किंवा या अंगणवाड्या बंद करा शिक्षण संस्था चांगल्या नसतील तर मुलांना घरी बसवलेले कधी पण चांगलेच महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्र्यांनी, व  भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुद्धा या शिक्षण व्यवस्थेकडे कडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा तरुण भारत होण्याच्या ऐवजी अविकसनशील भारत होण्याकडे वाटचाल होईल यात शंका नाही.

Post a Comment

Previous Post Next Post