समाजकल्याण विभागाच्या योजनाः ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरचीकांडप पुरविणे.

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण  ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरचीकांडप पुरविणे योजना संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यात ही योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट्य, पात्रता, लाभ, कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.

ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरचीकांडप पुरविणे

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजनाः स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यक्तींना व महिला यांच्या्साठी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना महिलांना मिरचीकांडप पुरविणे वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी योजना घेतल्या जातात.

राज्य घटनेत नमूद केल्या प्रमाणे, राज्य सरकारचे कर्तव्य आहे. की जानुपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्टये ठेऊन कारभार केला पाहिजे. आणि समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे. त्यासाठी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली. त्यामाध्यमातून संविधानाचे राज्य स्थापन झालेपासून कार्य अविरतपणे चालू आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना दरवर्षी राबविणेत येत असतात. त्यापैकी . ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरचीकांडप पुरविणे हि योजना देखील राबवली जाते. तर योजना विषयी सविस्तर माहिती आपणास देत आहे.

योजनेचे स्वरुप :

ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे-  प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे.इत्यादी व्यवस्था करुन ग्रामीण भागातील मागासवर्गीय यांचे सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे.

नियम, अटी व पात्रता इ. :

सदर काम हे ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्ययक असून. ग्रामीण वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा ग्रामीण वस्तीच्या आवश्य्कतेनुसार कामे घेण्या्त येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक मागासवर्गीय वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देण्यात येते.

योजनेचे पात्रता निकष :

  •  - अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
  •  - या गटांना ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असते
  • - किमान दहा व कमाल २० जणांचा लक्ष्य गट असावा लागतो
  • - दारिद्र्यरेषेखालील व मागासवर्गीय महिलांना प्राधान्य.

आवश्यक कागदपत्रे :

  • - विहित नमुन्यातील अर्ज
  • - दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
  • - मागासवर्गीयांचे जातीचे प्रमाणपत्र
  • - प्रमुखाची दोन छायाचित्रे

अर्ज कोठे कराल?

याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज ग्रामीण महिला करिता मिरची काढणी यंत्र हा जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात उपलब्ध असतो. यासाठी या विभागाच्यावतीने नियुक्त केले आहेत. या समन्वयकांच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना महिलांना मिरचीकांडप पुरविणेयोजने साठी जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात अर्ज करावा लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post